माज़या कविता
Sunday, February 7, 2010 2:43:09 PM
जो इथे आला तो जाणारच हे कडू लिखीत सर्वाना ग्यात आहे.
लोक गेल्यावर कोण त्यांचे नाव घेणार, असा सगळ्यांचा भास आहे.
जरा आठवा जे लढले आपल्यासाठी, जे हसत मेले आपल्यासाठी.
विसरू शकू का त्यानी वाहिलेले रक्त? असे हे आपल्या देशाचे प्रेमळ प्रेम भक्त.
ते गेले आपल्याला कोड्यात टाकून... मरु शकतो आम्ही देशासाठी हे सगळ्याना दाखवून.
त्यांचे हे बलिदान इतिहासात कायमचे कोरले...
आपण म्हणतो आपल्याला आहे झेंड्याचा मान.
दुसर्या दिवशी तोच झेंडा पायाखाली येतो आणि आपण म्हणतो मेरा भारत महान...
२६ जानेवारीला सगळ्याना हेच आहे सांगणे -
चला करूया काही दान आपल्या देशासाठी...
करून रक्तदान वचवू एक तरी प्राण, आपल्या देशासाठी... आपल्या देशासाठी...














