Skip navigation.

Bharat Says

Bharat's Open Heart

आमचे क्रिकेट वेड

आता थोड्या दिवसन पूर्वी माझ्या रुमवर प्रभास,धन्या आणि मी असं तिघं क्रिकेट खेळलो. :smile: कोणाचा तरी प्रोजेक्ट रिपोर्ट होता, ती आमची बॅट. आणि कागदाचा बोळा म्हणजे आमचा बॉल.. आणि आमचं क्रिकेट सुरु!! बऱ्याच दिवसांनी असं ’इन-डोअर क्रिकेट’ खेळलो! दंगामस्ती करत खेळलो आणि मी,प्रभास आणि धन्या - आम्ही तिघंही फ्लॅशबॅकमध्ये गेलो.

आम्ही जेव्हा बि.सी.एस.च्या तिसऱ्या वर्षाला होतो, तेव्हा टिळे सरांच्या क्लासवर दुपारी असंच क्रिकेट खेळायचो. बऱ्याचदा कॉलेजला दांडी मारलेली असायची. तिथुन निघुन थेट सरांच्या क्लासवरच टपकायचो आम्ही. मग कोणाचं तरी ’रायटींग पॅड’ आमचं बॅट बनायचं आणि सरांची बोर्ड पुसायची कापडं आमचा चेंडु तयार करायचे. सरांनी क्लास सांभाळायला ठेवलेला ललितसुद्धा असायचा आमच्या सोबत. नुसता धांगडधींगा चालायचा आमचा.

क्लासमध्ये प्रोग्रामींगची प्रॅक्टीस करण्यासाठी एक स्वतंत्र लॅब होती. तेच आमचं मैदान असायचं. कधी कधी काही पोरी तिथं प्रोग्राम करत बसलेल्या असायच्या.. पण आम्हाला कसलीच पर्वा नसायची.. कोणी तक्रार करेल वगैरे काही भितीच नाही ना!

सर यायच्या वेळी मात्र आम्ही सगळं परत जागच्या-जागी ठेवुन निमुटपणे प्रोग्राम करतोय असं दाखवायचो. टिळे सरांना घाबरायचो आम्ही सगळेच.

एकदा काय झालं, आम्ही असंच क्रिकेट खेळत होतो. कोण बॅटींग करत होतं आठवत नाही आता. एक मुलगी लॅब मध्ये प्रोग्राम करत बसली होती. शॉट मारतांना बॅट्समनच्या हातुन पॅड सटकलाच, आणि भिरभिरत गेला थेट ती पोरगी बसलेली त्या कॉम्प्युटरवरच! मुलगीतर वाचलीच थोडक्यात, कारण अन्यथा डोकं फुटलंच असतं तीचं, पण पॅड नेमके मॉनिटरच्या कोपऱ्यावर बसले. जरा अजुन अलिकडे बसले असते तर स्क्रीनचा नक्कीच चक्काचूर झाला असता! आणि मग हे क्रिकेट आम्हाला चांगलंच महागात पडलं असतं... पण वाचलो!

अगदी इंटरनल परिक्षेच्यावेळी सुद्धा आम्ही हे क्रिकेटायन सोडले नाही. पेपरच्या आधी आम्ही सगळे क्लासवर जमायचो. बाकीचे लोक तिथं अभ्यास करत बसलेले असायचे आणि आम्ही मात्र क्रिकेट खेळत असायचो. खुप एन्जॉय केलंय आम्ही हे असं ’इन-डोअर’ क्रिकेट.

तसं आम्ही ’आऊट-डोअर’ क्रिकेट सुद्धा भरपुर खेळलो आहोत, आणि त्याचे सुद्धा भरपुर मजेशीर किस्से आहेत.. पण ते नंतर सांगेन, पण नक्की सांगेन. :smile:

माझा दिवाळी साठी प्रवास

तर मित्राणो माझा दिवाळी साठी चा प्रवास बराच मजेशीर झाला.:smile: :smile:

पहिले एकतर बॅगचा इश्यू आणि नंतर बस चा किस्सा.

तर ज़ाल अस,मी शुक्रवारी सुट्टी घेतली आणि म्हटल काम करून सकाळी सकाळी तसचा जाउ घरी (म्हणजे नाशिक ला).म्हणून रूम वर सगळी पॅकिंग केली आणि मला समजल की बॅग लहान पडत आहे म्हणून मी माज़या एका office च्या मित्राला बॅग आणायला सांगितली.

मग मी पॅकिंग तशीचा रूम वर तेहून office आलो,म्हटल त्याची बॅग घेऊ आणि परत पॅकिंग करू आणि मग जाउ.मी आपला त्याची बॅग office मधे शोधतो आहे पण सापडत नाही,मित्राला call केला आणि सांगितल,अरे बॅग काही सापडत नाही,तर म्हणतो कसा अरे आहे तिथेच.मी आपला काम सोडून बॅगच्या मागे.तरी पण बॅग काही सापडली नाही :cry: ,मग अजुन एका office च्या मीत्रणे call केला आणि सांगितल माज़या कडे आहे बॅग, मी येतो सकाळी घेऊन आणि तुला पण शिवाजी नगर ला सोडतो.मग मी आपला निवांत झालो आणि कामाला लागलो.:yes:

सकाळी ४ वाजले तरी मित्रा चा call नाही sms नाही, मी परत टेन्षन मधे आलो.:insane: त्याला मी आपला call वर call करत आहे पण तो काही माझा call काही उचलायला तयार नाही.मग मी आपला ४.४५ ला सकाळी office मधून रूम वर जायला निघलो.

थोडा वेळाने त्याचा call आला आणि सांगू लागला "अरे आमच्या Gate ची किल्ली watchman ने हरवली आहे,ती सापडली की मी येतो, तू जा रूम वर तोवर.मी गेलो रूम वर आणि तो आला,मग त्याने मला शिवाजी नगर ला सोडल.:up:तिथे गेलो, तर बस ला टाइम होता,एकदाचा टिकेट मिळाल आणि माझा पुणे--नाशिक प्रवास चालू झाला.

पण हे पण देवाला मान्या नसावे, नाशिक फाट्याला बस खराब झाली.:insane:.तिथे परत बस कंडक्टर बरोबर भाडंण झाल तरी इश्यू काही स्लॉईवे होईना.तिथे परत १ तास वाया गेला.मी आपल खूप वैतगलो आणि शेवटी एका बस मधे बसलो आणि परत माझा प्रवास चालू झाला.
देवा कडे प्रार्थना केली म्हणतल परत आत्ता काही होऊ देऊ नको रे बाबा.:confused:

शेवटी मी आपला २.०० ला घरी पोहचलो.:yes: :up:

Funny

वेक अप...वेक अप !

१३ ऑक्टोबरला नक्की महाराष्ट्र विधानसभेच्याच निवडणुका होत आहेत ना ? मग प्रचारात ही चिखलफेक कसली सुरू आहे ? महाराष्ट्रापुढचे जे खरेखुरे प्रश्न आहेत, त्याबद्दल कुणीच का बोलत नाहीय ? की एकमेकांची उणीदुणी काढणे, हाच यंदाच्या निवडणूक प्रचाराचा मुख्य अजेंडा आहे.. ? वेक अप... प्लीज, वेक अप !


राज ठाकरे उंदीर... १० ऑक्टोबरच्या सभेत एक घाव, दोन तुकडे करतो - उद्धव ठाकरे
उद्धव आयत्या बिळावर नागोबा... माझ्या नादी लागू नका - राज ठाकरे
राज म्हणजे काही सुपरमॅन नाही, तो सुपारीमॅन आहे - नीलम गो-हे
बापकमाईवर जगणारा उद्धव या जन्मात मुख्यमंत्री होऊ शकत नाही - शिरीष पारकर
घरातलाच ‘ जीना ’ मराठी मतांमध्ये फूट पाडतोय - सामना अग्रलेख
सुपारीबाज, खंडणीखोरांच्या हाती सत्तेची चावी देवू नका - उद्धव ठाकरे


अरे काय, चाललंय काय, या महाराष्ट्रात ? १३ ऑक्टोबरला नक्की महाराष्ट्र विधानसभेच्याच निवडणुका होत आहेत ना ? मग प्रचारामध्ये ही चिखलफेक कसली सुरू आहे ? महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाला ज्या समस्या भेडसावत आहेत, राज्यापुढचे जे खरेखुरे प्रश्न आहेत, त्याबद्दल कुणीच का बोलत नाहीय ? की एकमेकांची उणीदुणी काढणे, हाच यंदाच्या निवडणूक प्रचाराचा मुख्य अजेंडा आहे... वेक अप, यार . .. वेक अप !

महागाई, वीजटंचाई, शेतकरी आत्महत्या, दहशतवादी हल्ले, जातीय दंगली, कायदा व सुव्यवस्था, कर्जबाजारीपणा, दुष्काळ, कमी झालेला पाऊस, पिण्याच्या पाण्याची टंचाई, बंद पडणारे उद्योग, वाढती बेरोजगारी, सामान्य माणसाला परवडतील अशी घरे, महानगरांचा विकास, सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या, भ्रष्टाचार, वाढत्या झोपडपट्ट्या... समस्यांची आणि अडीअडचणींची ही यादी मारूतीच्या शेपटाप्रमाणे लांबच लांब वाढत चालली आहे. पण आमच्या राजकीय नेत्यांना ना या प्रश्नांची जाण आहे, ना सामाजिक भान आहे... खरं तर या मुद्यांवरून अख्खा महाराष्ट्र ढवळून निघायला हवा होता. परंतु यंदाच्या निवडणूक प्रचारात दुर्दैवाने मुद्यांऐवजी गुद्यांचीच भाषा केली जातेय. जीवन-मरणाचे प्रश्न राहिले बाजूला, मराठींचा कैवारी कोण आणि उत्तर भारतीयांचा मसिहा कोण, यावरूनच रणकंदन सुरू आहे. नेमका विरोधक कोण, सत्ताधारी कोण, कोणाचा कोणाला कशासाठी विरोध आहे, हेच उमगेनासे झाले आहे. काँग्रेस-आघाडी काय, शिवसेना-भाजप युती काय, रिडालोस काय, मनसे काय, अपक्ष काय आणि बंडखोर काय... कुणालाही हे प्रश्न सोडवण्यात रस नाही. प्रत्येकाचा इंटरेस्ट एकच - सत्ता कशी मिळवायची ? किमानपक्षी सत्तेत भागिदार कसे व्हायचे ? काहीच नाही तर पाठिंब्याच्या बदल्यात किंमत कशी वसूल करायची ? जनहिताचे ना कुणाला सोयर ना सूतक... महाराष्ट्रापुढे आ वासून उभे असलेले हे सगळे प्रश्न राजकीय पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यांच्या आणि वचननाम्यांच्या गोधडीत छानपैकी गुंडाळून ठेवले आहेत.


हे टाळायचं असेल तर प्लीज... प्लीज वेक अप ! गुद्दे विसरा आणि शेवटच्या आठवड्यात तरी मुद्यांवर बोला बाबांनो.. !!

सौज्जन --महाराष्ट्रा टाइम्स

"तो","ती", त्यांची प्रेमकथा, तसल्या नजरा आणि आयुष्य

[ वेळ सकाळी ६ च्या दरम्यान ....]
तो : वाढदिवसाच्या शूभेच्छा ...
ती : ओह .. हो . थँक यू सो मच . मी अजून झोपेतून उठत आहे ...
तो : ओह, म्हणजे तुला सगळ्यात पहिल्यांदा मी फोन केला ...
ती : नाही ना ! "त्या" ने मला रात्री १२ वाजताच 'विश' केले.
तो : हा 'तो' कोण ?
ती : कमॉन यार , अजून कोण ? नितीन ...
तो : अस्सं असं , मग आजचा काय प्रोग्राम आहे ?
ती: नितीन मला म्हणाला की तो मला वाढदिवसाचे 'सरप्राईज गिफ्ट' देणार आहे. त्यानंतर आम्ही फुलांचे प्रदर्शन पहायला जाणार आहोत. मला खूप मस्त वाटत आहे कारण मी फुलांचे प्रदर्शन कधीही पाहिले नाही, माझ्यासाठी तेच 'गिफ्ट' आहे.
************************************
तो: हाय !!! तू 'पॅनकार्ड क्लब' मध्ये 'रॉक शो' बघायला गेली होतीस ना ? कसा झाला शो? कोण होते तुझ्या बरोबर ?
ती : नितीन ....
तो: ठीक आहे. दूसरे म्हणजे , तुझा 'रिझ्युमी' कोणी रेफेर केला 'इंफोसिस' साठी ? तू तर म्हणाली की तुझी तेथे काहीच ओळख नाही म्हणून ....
ती : हो. नितीनचा तिथे एक मित्र होता , त्याने 'रेफर' केला माझा 'रिझ्युमी' ....
तो : हो का? म्हणे ' H ऱ इंटरव्युवस' रात्री ८ वाजेपर्यंत चालू होते. मग तुझा घरी जायला प्रोब्लेम आला आसेल ?
ती : नाही . नितीन ने सोडले मला . तो ऑफिसमधून आला, मला घरी सोडले आणि मग त्याच्या रूमवर पोहचायला त्याला ११ वाजले. त्याने रात्री जेवण पण केले नाही. बिचारा नितीन ....
************************************
तो : अगं तू उद्या घरी चाललेली आहेस ना ? मग 'रिझर्वेशन' केले का नाहीस ?
ती : मी त्याला सांगीतले आहे , तो म्हणाला की त्याचे 'स्वारगेट' ला काहीतरी काम आहे, तेव्हा त्यासाठी गेल्यावर तो येताना जागा बूक करून येणार आहे. मी आता एकदम निवांत झाले ..
तो : हाय, तुझी 'आय बी एम' मधली 'रिटन टेस्ट' कशी झाली ?
ती : यार , नाही क्लीयर झाली . खरं तर मी व्यवस्थीत तयारी केली होती . नितीन माझ्या रूमवर आला होता. त्याने मला 'जावा' चे थोडे बेसिक्स सांगितले. त्यामुळे मी एकदम बिनधास्त झाले होते पण माझ्या नशिबात काहीतरी वेगळेच होते.
तो : ओके , मग रविवारी काय केले?
ती : आम्ही ' ओम शांती ओम' बघायला गेलो होतो. नितीन खरं तर 'हिंदी पिक्चर ' बघत नाही पण मी 'आय बी एम' च्या किस्स्यामुळे खूप निराश झाले आहे असे वाटून याने पिक्चर बघायचे ठरवले. मला एकदम मस्त वाटले आणि तो हिंदी पिक्चरला आला ह्याचे आश्चर्य वाटले. त्याला पण पिक्चर आवडला. त्यानंतर त्याने त्याच्या 'वाढदिवसाचे बिलेटेड पार्टी' दिली. आम्ही 'पिझ्झा हट' ला गेलो होतो.
तो : मग तुझे 'बिलेटेड गिफ्ट' काय होते ? ती : ते तर मी त्याच दिवशी दिले. मी त्याला बरोबर रात्री १२ वाजता फोन केला , तो दिवसभर बिझी असल्यामुळे आम्ही संध्याकाळी भेटलो तेव्हा मी त्याला एक मस्त 'टाईम पिस' गिफ्ट दिला. तो वेलेच्या बाबतीत एकदम बेफिकीर आहे म्हणून मी मुद्दमच ते दिले. त्यामुळे त्याला नेहमी माझी आठवण येइल. तेव्हा त्याने मला पार्टी दिली नाही कारण तो लगेच ऑफिसमध्ये परत गेला ....
****************************************************
तो : हाय , तुझ्या 'शॉपर स्टॉप' च्या प्रोग्रमचे काय झाले ? ती : हॅलो, मी तुला नंतर फोन करते....
तो : तु मला नंतर फोन केलाच नाहीस ? म्हणून मी तुला आत्ता फोन केला . ती : हो यार , तु जेव्हा फोन केला तेव्हा मी नितीनबरोबर 'संभाजी पार्क' मध्ये होते. त्याचा सकाळ-सकाळ मूड खराब झाला होता, त्याचे त्याच्या भावाशी भांडण झाले होते. अशा वेळी त्याला एकटे सोडणे मला चांगले वाटले नाही म्हणून मी माझा शॉपिंग प्लान रद्द केला
****************************************************
तो : हाय , काय झाले ? आज एकदम खूष दिसत दिसत आहेस ?
ती : आहेच. आज माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. नितीन ला अमेरिकेत 'ऑनसाईट प्रोजेक्ट ' साठी पाठवणार आहेत. त्याच्या कष्टांचे आज त्याला फळ मिळाले. तो खूप दिवस याची वाट बघत होता. तो अजून १५ दिवसांनी निघणार आहे .
तो : तू त्याला खूप 'मिस' करशील.
ती : खरचं. मी त्याच्यावर खूप अवलंबून आहे. मला संजूचे आभार मानायला हवेत कारण त्याच्यामुळेच माझी नितीनशी ओखख झाली. नितीनशिवाय पहिले काही दिवस या अनोळखी शहरात कोणी मित्र, नातेवाईक आणि महत्वाचे म्हणजे नोकरी नसताना राहणे अशक्य होते. त्या कठीण दिवसात त्याने माझी खूप काळजी घेतली. तो खूप परिपक्व, समजूतदार आणि काळजी घेणारा मित्र आहे.
तो : तो तुझ्यावर प्रेम करतो. .........
ती : मला माहीत आहे...........
तो : आणि तू ? तुझे त्याच्यावर प्रेम नाही ?
ती : मला तशी आवश्यकता वाटत नाही ....
तो : चल काहीतरीच काय ? तुला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही ?
ती : प्लीज ... तसे म्हणू नको.मी त्याला 'माझे त्याच्यावर प्रेम आहे अथवा असेच काही' असेसे कधीच म्हणले नाही.
तो : कमॉन , तो काय मूर्ख आहे की ज्याला तुझ्या वागण्यावरून काहीच कळत नाही ? त्याला एकटे सोडू नको....
ती : मी त्याला माझ्या घरच्या वातावरणाबद्दल सगळे सांगितले. त्याला माहित आहे माझे वडिल कसे आहेत ते, त्यांना मी दूसऱ्या जातीतील मुलाशी लग्न केलेले अजिबात खपणार नाही. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे व मी त्यांना दूखवण्याचा विचार पण करू शकत नाही. ते माझ्यासाठी योग्य मुलगा हूडकत आहेत.
तो : हम्म ... मला तुझे वागणे आणि बोलणे बिलकूल समजले नाही ....
ती : शनिवारी मी घरी चाल्ले आहे, मला बघायला एक मुलगा येणार आहे.
तो : वा. छानच. पहिली वेळ ना तुझी. बेस्ट ऑफ लक .... कोण आहे तो ? काही अंदाज ?
ती : जावू दे यार , ते महत्वाचे नाही . माझे पालक खूष आहेत हीच माझ्यासाठे महत्वाची गोष्ट आहे .........
********************************************************
तो : काल मी तुला फोन लावला पण बऱ्याच वेळ तो एंगेज होता .शेवटी मी कंटाळून ११ वाजता झोपलो.
ती : हो. मी नितीनशी बोलत होते. त्याला माझ्या लग्नाची काळजी वाटत आहे. त्याला वाटते की मला माझ्या अपेक्षा पूर्ण करणारा मुलगा मिळेल का नाही ? मी खूष असेन का नाही ? मला हे ऐकून खूप वाईट वाटले, पण मी मी तर काय करू ? मी त्याला समजावले की त्याला काळजी करण्यासारखे यात काही नाही, जे काही माझे पालक ठरवतील ते माझ्यासाठी चांगलेच असेल.....
तो : तुझे लग्न झाल्यावर नितीनला कसे वाटेल ? त्याला एकटे एकटे वाटणार नाही ?
ती : काळ हे सर्वोत्तम औषध आहे. त्याला त्याची सवय होईल. मी त्याच्या आयुष्यात येण्यापूर्वी तो जगतच होता ना? मी त्याला हेच समजवण्यापलिकडे काहीही करू शकत नाही .
*********************************************************

शेवटी "ती" तीच्या वडीलांनी पसंत केलेल्या [ आणि स्वाभाविकच "ती" ला पसंत असणाऱ्या ] मुलाबरोबर लग्न करते. पहिले काही दिवस तिचा नितीन बरोबर " जी टॉक" वर कॉटॅक्ट असतो. हळूहळू ती नितीनला विसरून नव्या "त्या" बरोबर खूष राहते. पण नितीनला "ती" ला विसरणे इतके सोपे नसते.... किंबहूना अशक्य असते....

*** मुली असे का करतात ???????????????? ***
* ती जेव्हा शहरात नवीन होती तेव्हा तीला नितीनची गरज होती.
* तीला राहण्याची व्यवस्था करण्यासाठी नितीनची मदत हवी होती.
* त्याने तीचा "रिझ्युमी" बनवला. तो तिला मुलाखतीच्या ठीकाणी सोडायला आला.
* त्याने तिला तिच्या मुलाखतीसाठी मदत केली. तीला स्वताचे कौशल्य, ताकद वाढवण्यासाठी मदत केली.
* ती च्यासाठी त्याने तीचा "मॉक-इंटरव्युव" घेतला .
* त्याने तिचे "रिझ्युमी" त्याचा कामात वेळ काढ़ून सगळीकडे पाढवले.
* ति च्या अपयशात तीला ईमानदारीने साथ दिली.
* ती च्या खूषीसाठी तो तिला शॉपींग, पिक्चर, बागेत घेउन गेला.
*त्या चा देवावर विश्वास नसताना तो तिच्यासाठी तिच्याबरोबर देवळात जायचा.
* जेव्हा ति च्या पालकांनी लग्नासाठी घाई केली तेव्हा रडण्यासाठी ती ला त्याच्या खांद्यांची आवश्यकता होती.
* लग्नासाठी तयार होताना तीला त्याची मदत हवी होती.
* त्याने लग्नाला यावे असा तिचा हट्ट होता [ कारण तो तिचा खरा मित्र आहे ]

***त्याने ह्या सर्व गोष्टी एकदा सुध्धा 'नाही' न म्हणता अतिशय प्रामाणिकपणे केल्या कारण ....***
* त्याचे तिझ्यावर प्रेम होते.
* त्याला तीच्यविषयी काळजी वाटत होती .
* त्याच्या आजच्या ज्या काही यशामागे तिच्या प्रेरणेचा वाटा आहे असे तो मानत होता .
* तो तिला आपले आयुष्य मानत होता.
* तो तिच्यासाठी बदलला.
* केवळ तिझ्यामुळे आज तो खूष होता, आपले दूख्ख विसरला होता.
* त्याचासाठी ती महणजे "आयडीयल भारतीय नारी " होती .
* तिला आवडतो म्हणून त्याने "क्रिष्णा" चा फोटॉ पाकिटात ठेवायला सूरवात केली.
* त्याने "साप्ताहीक सुट्टीला " ऑफीसमध्ये जाणे बंद केले केवळ तिच्यासाठी ...
* ऑनसाईट जाणे त्याचे स्वप्न होते पण आज तो पूण्यात नोकरी हूडकत होता फक्त तीच्यासाठी.
* "ती" त्याच्यावर अवलंबून होती जणूकाही ती "त्या" च्या शिवाय जगली नाही आणि जगू शकत नाही.

'त्या' ला वाटत होते की त्याचा जन्म फक्त 'ती' ची काळजी घेण्यास झाला आहे. तीला अवलंबून राहण्यास आवडायचे आणि त्याला काळजी करण्यास, शेवटी ते सो कॉल्ड "प्रेमात पडले" आणि त्याच्या जिवनातील शोकांतिकेला सूरवात झाली. ती ला आपल्यासाठी सर्वोत्तम जोडीदार हवा होता पण ती ची आपल्या पालकांना दूखवण्याचे तयारी नव्हती. त्या ला माहित होते की ती त्याला कधिच मिळणार नाही तरीपण तो ती ची काळजी घेत होता.[ कारण ती कुठेही असली, आणि कुणासोबतही असली तरी खूष असावी असे त्याला वाटत होते ....]

***शेवटी काय तर ??? ***
'ति'चा साखरपूडा झाला , आयुष्य चालुच आहे ....
दिर्घकाळ चालणारे फोनकॉल्स छोटे झाले आहेत,आयुष्य चालुच ....
" शूभ प्रभात" चे एस एम एस आता "हॅप्पी वीकएंड" वर आले आहेत, आयुष्य चालुच आहे........
त्याच्या याहूच्या इनबॉक्स मध्ये एक सुध्धा 'ती'चा न वाचलेला मेल नाही, आयुष्य चालुच आहे.......
कंटाळवाण्या आठवड्याच्या कामानंतर "बरिश्ता" मध्ये कॉफी करण्यास कोणी नाही, आयुष्य चालूच नाही...
'त्या'ने पून्हा धूम्रपान सूरू केले, आयुष्य चालूच आहे.........
आज 'तो' फक्त फ्लॅशबॅकचे आयुष्य जगतो ....
'त्या'ला नोकरीत बढती मिळाली, 'तो' मॅनेजर झाला, 'ती' २ मुलांची आई झाली, आयुष्य चालूच आहे....
कालांतराने 'त्या'ला पण एक सुशील, सुंदर, कर्तबगार, प्रेमळ पत्नी मिळाली, आयुष्य चालूच आहे...

*फार थोडे जण असतील की ज्यांच्या आयुष्यात हे घडलेले नाही ... आणि ते नाही म्हणायची हिंम्मत करतात ... हे बहूदा प्रत्येकाच्या आयुष्यात घडते ....*
December 2009
M T W T F S S
November 2009January 2010
1 2 3 4 5 6
7 8 9 10 11 12 13
14 15 16 17 18 19 20
21 22 23 24 25 26 27
28 29 30 31