लेझी लम्हे
Tuesday, 19. May 2009, 17:34:33
गाढ साखरझोपेत असताना, एकदम घड्याळाचा किचाट गजर अंगावर धावून येतो आणि त्याचे दोन टोकेरी काटे उठल्यापासून आपला पिच्छा पुरवतात.
पण.. उद्या हे काही नाही. नो.. नेव्हर!
अरे पाच दिवस वेळेने तुमचं खोबरं केलं. पण, यापुढचे दोन दिवस तुमचे आहेत. टुमारो यू आर द ऑलटाइम किंग.
कोणते हे दिवस ते आलंय का लक्षात तुमच्या? यू वॉन्ना हिंट?
ओके. अरे, शुक्रवार आल्यापासून आपण हवेत असतो. इसी दिन के इंतजार व्हाइट कॉलर्ड लोगों को हमेशा होता है..
आलं लक्षात?
येस.. इट्स अ वीकेण्ड टाइम. शनिवार, रविवारचा. आपल्या हक्काच्या सुट्टीचा.. आपल्या मजीर्चा.. फिकिरलेस, टेन्शनफ्री दिवस.
आठवड्याभराच्या झटापटीने आलेला हँगओव्हर अजून उतरलेला नसतो. त्यामुळे वीकेण्डला बाहेर पडणं तसं कंटाळवाणंच. त्यात हल्ली उन्हाचा कडाका वाढल्यामुळे हा कंटाळा वाढलेला. त्यापेक्षा घरातच रेंगाळणं कितीतरी सुखदायक. मग, सुरू होतं आळसाचं राज्य. एरवी त्याला पदोपदी झुगारणारे आपण यावेळी मात्र, त्याला आपल्या मानेवर बसवून झोकात मिरवत असतो. आळशीपणाचा अस्सल 'स्टॅमिना' वीकेण्डच तर दाखवतो आपल्याला. आठवडाभरातल्या थकव्याला डच्चू देण्यासाठी घरात नुसतं रेंगाळणं एकदम एण्टरटेनिंग असतं. या रेंगाळण्यातूनही आपण फ्रेश होतो हे तर त्याहून अजब. हं... पण, रेंगाळताना काय करायचं यासाठी हे वाचाच.
याची तयारी मात्र, आदल्या रात्रीपासूनच! अलार्मचा 'चिवचिवाट' एकदम बंद. उजाडलेल्या प्रकाशामुळे लवकर जाग नको म्हणून खिडक्यांचे पडदे काचांवरून सोडलेले. शांत झोप यावी म्हणून केसांना मस्तपैकी तेलमालिश केलेली.
मग सकाळी कधीतरी नऊ वाजता डोळे उघडतात. पण ऑफिस नसल््याचं आठवतं आणि जीव मोठ्या पातेल्यात पडतो. आता पुढचा प्रश्न, काय करायचंय एवढ्या 'भल्या'(!) पहाटे उठून? मग पुन्हा झोप. 'किती वाजले उठा आता?', असा एक त्यावेळी 'कर्कश्य' वाटणारा आवाज भुंग्यासारखा दर दहा मिनिटांनी कानात भुणभुण करत राहतो. मग, डोळे किलकले करत, कपाळावर शेकडो आठ्या पाडत उठल्यासारखं करायचं आणि आपल्याला उठवणारा तो 'भुंगा' गेला की, उशी कानावर रेटून झोपून जायचं.
दहावरून काटा सरकतो.. अगदी साडेअकरा होतात. मग, उठण्याचा विचार. उठायचं. गरमागरम, आलं घातलेल्या चहाचा झुरका मारायची तलब होईलच. 'एवढ्या उन्हाचा चहा?' असा आपलाच प्रश्न. पण, 'चहा प्यायला मूड असेल तर अगदी चवीचवीने चहा प्यायचा. गडबड कुठेही नाही.
तोपर्यंत बारा वाजलेले असतात, अंघोळीचा विचारही आता शिवत नाही. मग, रेडिओवरची गाणी ऐकत वाटलं, तरच पेपर चाळायचा. सुट्टी आहे आणि टीव्ही नाही? टीव्ही लावायचा आणि मिळेल त्या जागी पसरायचं. चॅनल सफिर्ंग आलंच. पण, न्यूज चॅनल सोडून. तोपर्यंत भुकेची जाणीव होईल. हवं तर काही ऑर्डर करा. तो येईपर्यंत घरातल्या आरबट-चरबट खाऊवर ताव मारायचा. मग, जेवण. पोळीभाजीचं जेवण नको वाटणं साहजिक आहे. पण, पर्याय नसतो. जेवणावर ताव मारला, की टळटळीत दुपारी तुमचा बेड तुमची वाट पाहात असतोच.
वाटलं तर लोळायचं. तोपर्र्यत चार वाजतात. मग, जरा बौद्धिक ट्रायल घेत एखादं मॅगझिन, नॉवेल चाळायचं. कारण बौद्धिक कष्ट पडले की चहाची गरज वाटते. मग, चहा आला की मॅगझिनला सुट्टी. त्यानंतर, मित्रमैत्रिणींना आठवडाभराची फोनाफोनी, भरपूर गप्पा. यातूनच संध्याकाळचा बेत. अरे, एका फोनमुळे चकाट्या पिटायला पब्लिक जमू शकतं. नाहीतर इण्टरनेट आहे. अंघोळीचा विचार मनात आला तरच अंघोळ करा. मग, त्याच फ्रेश मूडमध्ये बाहेर पडा.
संध्याकाळी एक फेरफटका मारून यायचा. फेरफटका मारून आल्यानंतर गॅलरीत ठाण मांडून, फॉर अ चेंज म्हणून वाफाळलेल्या कॉफीचे निवांत घोट घ्यायचे. सोबत कांदा भजी असेल तर क्या बात है.
रात्री डिनर प्लॅन करायला हरकत नाही. 'स्पेशल समवन' किंवा फ्रेण्ड्स कोणीही चालेल. बाहेरचं जेवण नको असेल, तर पाणीपुरी, शेवपुरी असा मसालेदार मामला आहेच. आणि रात्री आइस्क्रीम. मग, बॅक टू पॅवेलियन!!!
दिवसभर रेंगाळूनही रात्री डोळे मिटू लागणारच. झोपायचं नसेलच, तर सॅटरडे धमाका किंवा सॅटरडे ब्लॉगब्लस्टर या टॅगलाईनखाली सतराशेसाठ पिक्चर्स चालूच असतात. नाहीतर रेडिओ आहेच.












