Skip navigation.

कवडसा

कॉपी-राईटेड!

July 2009

( Monthly archive )

आज आहे १०वा कारगील विजय दिवस!

, ,

आज पासुन बरोब्बर १० वर्षांपुर्वी भारत आणि पाकिस्तान मधील कारगील युद्धाची सांगता झाली. भारतानं टायगर हिल परत आपल्या ताब्यात घेतलं आणि पाकिस्तानी सैन्यानं माघार घेतली. या विजयाच्या प्रित्यर्थ आणि या युद्धात देशासाठी लढतांना प्राण गमावलेल्या जवानांच्या स्मृतीत आजचा दिवस आपण ’कारगील विजय दिवस’ म्हणुन साजरा करतो.


सिमारेषेवर, डोळ्यांत तेल घालुन
आपल्या देशाचं संरक्षण करणाऱ्या
या जवानांना माझा
मनापासुन, अभिमानपुर्ण सलाम!!



या दिवसासंदर्भात मी हे काही फोटो गोळा केलेत इंटरनेट वरुन.


कारगील गाव.


पकिस्ताननं पाडलेलं भारतीय हवाई दलाचं विमान.


भारतीय हवाई दलानं ’टायगर हिल’वर हल्ला केला त्याची छायाचित्रं.


... आणि भारताचा झेंडा फडकला!


देशासाठी प्राण पणाला लावलेल्या जवानांच्या आठवणीत उभारलेली स्मृतीशिला.

वेध सुर्यग्रहणाचे!

, ,

उद्या - दि. २२ जुलै २००९ रोजी खग्रास सुर्यग्रहण होतंय. भारतातुन सुद्धा खग्रास अवस्था दिसणार आहे. मुळात, या सुर्यग्रहणाची सुरुवातच भारतापासुन होतेय यंदा! मी तर खुपच उत्साहीत झालेलो आहे हे ग्रहण पाहण्यासाठी. यंदाचं ग्रहण हे "ग्रस्तोदित ग्रहण" आहे. म्हणजे, सुर्य उगवतांनाच त्याला ग्रहण लागलेलं असणार आहे. जरी पावसाळ्याचे दिवस असले, आणि पाऊसही पडत असला तरी मी मात्र जय्यत तयारी करत आहे. मी काही आशा सोडलेली नाही. यामागचं कारण सुद्धा तसंच आहे ना! यानंतरचं, भारतातुन दिसणारं खग्रास सुर्यग्रहण आहे तब्बल २५ वर्षांनंतर!! आणि ते ही दिसेल ते काश्मीरच्या उत्तर भागातुन. आणि त्याच्याही पुढचं खग्रास सुर्यग्रहण भारतातुन दिसेल ते जवळ जवळ सव्वाशे वर्षांनंतरच. त्यामुळं, खऱ्या अर्थानं, भारतातल्या बहुतेक सगळ्यांचंच हे अखेरचं खग्रास सुर्यग्रहण आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा हे ग्रहण बघण्याचा इवलास्सा चान्स सुद्धा चुकवु नका! ढग असले तरी आशा सोडु नका!! न जाणो, आपल्या नशिबानं सुर्य दर्शन देईल सुद्धा!

तुम्हाला माहितीये? या ग्रहणात चंद्राची सावली पृथ्वीवरुन तब्बल १५ हजार १५० कि.मी. अंतर कापणार आहे! आणि सुरुवातीला या सावलीचा वेग दर सेकंदाला ९ कि.मी. एवढा असणार आहे! नंतर जस-जशी ही सावली पुढे सरकेल, तस-तसा हा वेग मात्र कमी होत जाईल.

महाराष्ट्रातल्या काही प्रमुख शहरांमधुन सुर्य उगवण्याच्या वेळा आणि ग्रहणाचे प्रमाण मी इथं खाली देत आहे.
पुणे - स. ६.०९ वा. - ९३%
मुंबई - स. ६.१२ वा. - ९६%
नाशिक - स. ६.०६ वा. - ९८%
नागपुर - स. ५.४३ वा. - ९६%
कोल्हापुर - स. ६.१० वा. - ८७%

धुळे, नंदुरबार इथल्या सुर्योदयाच्या वेळा मला माहीत नाहीयेत, पण तिथुन १००% खग्रास सुर्यग्रहण दिसणार आहे.

ता.क. आत्ताच बाहेर पुन्हा एकदा जोराचा पाऊस सुरु झालाय. काय पडायचा तो आत्ताच पडुन घे म्हणाव.. संध्याकाळ ते उद्या ग्रहण संपेपर्यंत तु आणि तुझे ढग सुट्टी घे रे बाबा. आणि ग्रहण संपलं की लगेच ये मात्र!

१९९

, ,

आजकाल मी पुस्तकं वाचण्याचा सपाटाच लावलाय! मध्यंतरी ’सामरी’ ही भयकथा वाचुन झाली, पाठोपाठ ’कोमा’ ही गुढकथा. आणि नुकतंच, म्हणजे परवाच मी ’बिंदु सरोवर’ नावाची कादंबरी संपवली. राजेंद्र खेर यांची आहे. या कादंबरीच्या पाठीमागच्या पृष्ठावर लिहील्याप्रमाणंच ही ’वास्तवाकडुन अद्भुततेकडे नेणारी आणि प्रत्येक क्षणी उत्कंठा वाढवणारी" अशी सर्वस्वी अनोखी कादंबरी आहे ही!

भविष्यातल्या काळातली, म्हणजे २०२५ सालची कथा आहे ती. २०२३ साली चीननं तिबेटवर आक्रमण केलं आणि त्यातच त्यांच्या हाती एक संस्कृत हस्तलिखित सापडलं. जेव्हा त्यानी हस्तलिखिताचं भाषांतर करुन घेतलं तेव्हा त्यांना भारतातल्या एका गुढ ठिकाणच्या एका गुढ वस्तुबद्दल समजलं! अशी वस्तु जिच्या सहाय्यानं संपुर्ण विश्वाची रहस्य उघडतील आणि माणुस संपुर्ण विश्वावर ताबा मिळवु शकेल!! चिनी लोकांना ’त्या’ वस्तुचा ठावठिकाणा कळतो आणि सुरु होतो एक जिवघेणा पाठलाग!!

काय आहे हे बिंदु सरोवर? कोणतं रहस्य दडलं आहे त्यात?? हे माहित करायला मात्र कादंबरीचं पान अन पान वाचावं लागेल. :smile: