कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

५६

, , ,

आजकाल फारच गरम व्हायला लागलंय... यंदाचा हिवाळा अगदीच फुसका निघाला. awww जेमतेम १०-१५ दिवस काय ते खुप थंडी वाटली. बाकीचे सगळे दिवस सुमार गारव्याचे गेलेत. आणि आता तर.. म्हणजे गेल्या आठवड्यापासुनच बऱ्यापैकी गरम वाटायला लागलंय. ऑफिसमध्ये तरी दिवसभर ए.सी.मध्ये असतो, पण त्यातुन बाहेर पडलं की जरा जास्तीच गरम वाटायला लागतं मग. ए.सी. मध्ये बसुन काम करण्याचा हा एक तोटा आहेच.

नुकतीच महाशिवरात्री झालीये. असं म्हणतात की महाशिवरात्रीपासुन उकाडा वाढतो. उन्हाळ्याची चाहुल देणारा काळ सुरु झालाय. एकुणच आत्ताची गरमी बघता, उन्हाळा तसा बऱ्यापैकी भाजुन काढणारा असु शकतो. worried (निदान तशी शक्यता तरी नाकारता येणार नाही.) वऱ्हाड आणि विदर्भ म्हणजे उन्हाळ्यातले अगदी "हॉट स्पॉट"च! काय भयानक तापमान असतं तिकडं.. अशावेळी भरमसाट झाडांची कमतरता आवर्जुन जाणवते मग.

खुप झाडं असती तर किती छान झालं असतं...
प्रत्येक घरावर त्या झाडांची सावली पडली असती दुपारच्या वेळी...
रस्त्यानी येता-जाता उन्हाचा त्रास जाणवला तर लगेचच झाडाखाली थांबुन थोडावेळ विश्रांती घेता आली असती...
डोळ्यांनाही ती हिरवळ पाहुन जरा बरं वाटलं असतं.. smile

तसं झाडं अगदीच नाहीयेत असं नाहीये, पण जेवढ्या प्रमाणात पाहिजेत तेवढ्या प्रमाणातही नाहीयेत... sad

झाडांचं संवर्धन करण्यात पुणे महापालिका कमी पडते आहे असं वाटतं मला कधी कधी..
म्हणजे आता बघा, गेल्या काही दिवसांपुर्वीचीच गोष्ट. राजारामपुलाजवळ मातोश्री वृद्धाश्रम आहे. त्याच्याजवळच्या चौकात रस्ता रुंद केला महानगर पालिकेनी. तिथं दोन मोठी झाडं होती. खोडापासुन तोडली आहेत ती रस्त्ता रुंद करण्यासाठी. खोडं तशीच आहेत तिथं.. म्हणजे झाडं तर गेलीच.. पण खोडांचा अडथळा राहणारच! फायदा काय मग ती झाडं तोडण्याचा?

मला आठवतंय, नाशिकला जेव्हा मुंबई-आग्रा महामार्गालगत सर्विस रोड बनवण्याचं काम चालु होतं, तेव्हा सुद्धा अशाच अनेक झाडांचा अडथळा होता. पण नाशिक महानगरपालिकेनं एक अत्यंत स्तुत्य असा उपक्रम केला. त्यांनी ती सगळी झाडं अक्षरशः मुळासकट काढली, आणि गंगापुर रोडलगत परत लावली.. ती सुद्धा यशस्वीपणे! जगवली ती झाडं तिथं!!! त्यामुळं सर्विस रोडचं तर काम झालंच, पण झाडं सुद्धा वाचली. happy

पुणे नक्कीच मोठ्ठ आहे नाशिकपेक्षा. आणि पुण्यात अजुनही बरीच झाडं आहेत.
इथली महानगरपालिका सुद्धा हा उपक्रम नक्कीच राबवु शकतेय..
गरज फक्त इच्छाशक्तीची आहे.

’कवडसा’च्या प्रवासात २० हजार वाचकांचा टप्पा पुर्ण!अजि म्या आयुका पाहिलं..!

Comments

Anonymous Wednesday, February 25, 2009 11:32:28 AM

Seema Vinod writes: hi..... mast lihitos tu...... khup avadala.... keep it up mitra .... :)

Prabhas Gupteprabhas Wednesday, February 25, 2009 12:56:40 PM

Hi Seema!
Thanks a lot!! smile

Anonymous Thursday, February 26, 2009 6:12:22 AM

Seema Vinod writes: HI..... Prabhas....... kasa ahes.... I start reading your post recently n just belive... it's wonerfull... I read your 19th Dec 2008 post that RA-PHA vala.. and feel.... "MASTA ahe yar....." (he he he...... jara jastach lavakar vachla na... :lol: :P ) aso keep it up...... asach lihit ja ani amahi asach vachat rahu.... Bye.... Kalave Seeraphima Virphinod (Prayanta karate ahe..samjun ghyave..):D

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies