Skip navigation.

राहुल

Posts tagged with "राहुल"

सुरुवात...



.........पहिल प्रेम,पहिली मॆत्री, पहिली शाळा , .... गंमत असते ना पहिल्या पहिल्या गोष्टींची.
आज नविन वर्षाचा पहिला दिवस, आणि पहिला दिवस म्हणला की संकल्प आलेच.
......... मला आजही आठवतय माझी पहिली कविता ज्या कविते पसुन मी कविता लिहायला सुरुवात केली.
तो दिवस १ जानेवारी २००० होता. मा्झी पहिली कविता....पहा कशी वाटते.

आज मी ईथे थांबतोय
मागे वळून पाहण्यासाठी...
किती मिळवलं किती गमावलं
एकत्र मोजण्यासाठी...!

खूप काही गमावलय मी
थोडफार मिळवण्यासाठी...
आता मला लढायचयं
खूप काही मिळवण्यासाठी...!

आज मी सुरुवात करतोय
पु्ढे पुढे जाण्यासाठी...
संघर्ष करायचायं मला
सर्वकाही मिळवण्यासाठी...!

प्रयत्न करावे लागतील मला
मिळवलेल टिकवण्यासाठी...
आजपासून लढायचयं मला
खूप यश मिळवण्यासाठी...!

कधिही आता थांबायच नाही
मागे वळुन पाहण्यासाठी...
प्रयत्न आता करायचे फक्त
पु्ढे पुढे जाण्यासाठी...!


चारोळ्या..... १०


...... सध्या खुपच कमी वेळ मिळ्तोय लिखाण करायला. असो चालायच .
काही नविन चारोळ्या इथे लिहल्यात ... पहा कशा वाटतात .


आठवणींचे आले वारे
दाटुन आले कंठ सारे
डोळ्यातुन व्यक्त झाले
अश्रुंचे ते शब्द सारे...


नेहमी असच होत
खुप काही सुचत
तीथेही तु आलीस की
सगळ काही फसत...

पत्र...


..... तुम्ही कधी कोणाला पत्र लिहल असेलच, प्रेमपत्र flirt नसेल कदाचीत पण साध खुशालीच...
निदाण शाळेत असताना मित्राला पत्र लिहा हा प्रश्न तरी नक्की सोडवला असेलच की :D ... हो ना!
आताच्या काळात पत्र लिहण दुर्मिळ झालय हे खर पण, आपण सर्वांना सांगतो की पत्र/मेल लिहित जा.
.....आता तुम्हा्ला प्रश्न :confused: पडला असेल की आज कविता सोडुन हे काय लिहित बसलोय ... हो ना?
अस काही नाही बर का. तुम्ही आता ही कविता वाचली की तुम्हाला आपोआपच समजेल.


................ पत्र .............

येणारच नसलीच तर नकोच लिहू पत्र
माझी आठवण खरच व्याकूळ करत असेल
तरच लिहि...

लिहायच म्हणून नकॊ लिहू पत्र
ह्रदया्तील गुपित सांगायच असेल
तरच लिहि....

वेळ जात नाही म्हणून नको पत्र
क्षण क्षण युगापरी भासत असेल
तरच लिहि...

ऒपचारिकता म्हणून मुळिच नकॊ लिहू
प्राण कंठाशी आले
तरच लिहि...

आणि हो...
पत्र हे प्रेमपत्रच असायला हव असही नाही
मनातले विचार उत्स्फूर्त पणे
मांडत लिहि...

पोस्टमनला काम हवे म्हणून नकॊ लिहू पत्र
माझ काम नीट चालाव
म्हणून लिहि...

............. संग्रहीत

काही गोष्टी...


....... काही गोष्टी, आपण आपल्या मनातल सगळच दुसर्यांना सांगत नसतॊ, काही गोष्टी आपल्या मनातच ठेवत असतो.
मला पण असच वाटत. मी पण काही गोष्टी मनात ठेवतो तर काही गोष्टी सांगुन जातॊ.
आता तुम्हाला ही कविता वाचल्या नंतर कळेलच. तुम्हाला काय वाटत ते जरुर सांगा.

..........................काही गोष्टी..................

काही गोष्टी अशा असतात
कुणालाही त्या सांगायच्या नसतात
आपल्याच मनात ठेवायच्या असतात...

काही गोष्टी अशा असतात
बोलून दाखवायच्या नसतात
डोळ्यानींच त्या सांगायच्या असतात...

काही गोष्टी अशा असतात
लगेचच सांगायच्या नसतात
दुसर्यांनाच समजून घ्यायच्या असतात...

काही गोष्टी अशा असतात
सारख्याच आठवायच्या नसतात
आठवण्यासाठी त्या विसरायच्या नसतात...




एकटेपण...


................. ऎकटेपण कोणाला येत नाही, हा ते कधी येईल सांगता येणार नाही.
एकटेपणा वाटतो तेव्हा तुम्हि काय करता. आपल्याशीच गप्पा की अजुन काही.
मी जेव्हा ही कविता लिहली तेव्हा मला तर असच वाटल. तुम्हाला काय वाटत?

............!! एकटेपण !!...........

एकटेपण वाटल तर
आरश्यासमोर जाऊन उभे रहा
दिसतय का कोणी आपलं
ते शोधुन पहा...

दिसेलच कोणीतरी
मनापासून आवडलेल
ह्रदयाच्या एका कप्यात
खोलवर दडलेलं...

वाटलच तर त्याच्याशी
मनातल बोलत रहा
सांगेल तेही काहीतरी
मनापासून ऎकत रहा...

बोललच नाही काही ते
तरी तुम्ही बोलत रहा
मन मोकळ करण्यासाठी
कधीतरी एकट रहा...

तू...


.................... मी प्रेमात पडल्याच प्रत्येक क्षण सांगूण जातॊ.:heart:
तुम्हाला अस कधी वाटलय का? ... जेव्हा आपण प्रेमात :love: असतो, तेव्हा प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्षण आपण तीचाच विचार करतो.
............... मी जेव्हा ही कविता वाचली मला खुप आवडलि. अगदि मनातल सांगून गेली. पहा तुम्हाला काय वाटत?

.................!! तू !!.................

तू जवळ नाहीस तरीही
मी एकटा कधिच नसतो,
तुझ्या अस्तित्वाचा गंध
माझ्या भोवती दरवळत असतो...

विरहाचे उन जाळते कधी
मनाची तगमग होते,
तुझ्या डोळ्यातील शीतलता
त्यावर हळूच फुंकर घालते...

तुझ्या भेटीची ओढ
थंडी होऊन अंगाला झोंबते,
तुझ्या आठवणि शाल होऊन
पांघरुण घालीत ऊब देतात...

संध्याकाळी, एकांतवेळी
आठ्वणिंचा वारा सुटतो,
माझ्या प्रत्येक श्वासागणिक
तुझ्या केसांचा सुगंध घेतो...

होतो अबोल मग मी सुध्धा
अन तुझ्यामध्ये रंगून जातॊ,
मी प्रेमात पडल्याचं,
प्रत्येक क्षण सांगून जातो...


शब्द...


........ बरेच दिवस झाले लिहण्यासाठी शब्दच सापडत नव्हते. आज काही शब्द सापडले आहेत, खर तर मी माझेच काव्य किंवा लिखाण
येथे लिहणार होतो, पण म्हणल की तुम्ही मला एकट्यालाच किती सहन करणार... :lol: तर असो माझा संग्रह ही येथे लि्हण्यास काही
हरकत नाही अस मला वाटत. थोडासा तुम्हाला पण वेगळ काहितरी वाचायला मिळेल.....

....... !! शब्द !!.......

शब्द ह्रदय जोडुन जातात
शब्द ह्रदय तोडुन जातात
शब्द कधी काहीही न करता मोठा खेळ खेळून जातात
शब्द कधी विषारी होतात आणि नाते तोडुन टाकतात
शब्द मर्यादा न बाळगता कधी काहीही बोलुन जातात
शब्द कधी मनामध्ये काट्यांचे घर बनवून जातात
शब्द एखादा ऎकण्यासाठी कान जन्मभर वाट पाहतात
शब्द शब्द लिहता आयुष्याची पाने उलटून जातात
शब्दांबद्दल किती लिहावं?
शब्दच अपूरे पडुन जातात

..................... संग्रहीत

चारोळ्या .... ९

कोषातून बाहेर मज येऊ द्या
फुलपाखरु मी होणार आहे
सुरवंट होतो मी आगोदर
हे मात्र कधि विसरणार नाही...


कधी काय का कसं
कधी कोणाला कळेल का
कळालच कधी कोणाला काय
कोण कोणाला कळवेल काय... कळल का?

चारोळ्या.... ८


एकटेपण वाटल की मी
आरशामध्ये जाऊन पाहतो
आरश्यामधल्या माझ्याशी मी मगं
खुप काही सांगुन जातो

मनातल्या कप्यातले ते काही क्षण
आजही मला साद देतात
आठवणीने त्यांच्या
मनात माझ्या हुंदके येतात

सध्या एकट बसल की
खुपच एकट वाटत
एकटेपणाच्या दुःखाने मगं
मनात खुप टोचतं


काही माणस...

काही माणस
असतातच अशी
फुलात सुगंध
असावा तशी

काही माणस
असतातच अशी
पाण्याची लहर
समुद्रात जशी

काही माणस
असतातच अशी
पाण्याची सर
पावसात जशी

काही माणस
असतातच अशी
आपल्या जवळच सर्व
दुसय्रांना देतात तशी

काही माणस
असतातच अशी
गोड एक आठवण जशी
मनात साठवून ठेवावी जशी